Sunday, February 22, 2026

सन १९७१ च्या युद्धवीराची अनंतात भरारी

भारतीय वायुदलाच्या गाभ्याशी असलेल्या कर्तव्यदक्षता, शौर्य आणि तल्लख विनोदबुद्धी या गुणांचे एक उत्तम उदाहरण म्हणजे विंग कमांडर प्रताप मराठे. एक वर्षापूर्वी त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. 
एअर कमोडोर नितीन साठे (निवृत्त) यांनी ह्या लेखाद्वारे त्यांना दिलेली अखेरची सलामी.. 


विंग कमांडर प्रताप मराठे. 

 
मूळ लेख - एअर कमोडोर (निवृत्त) नितीन साठे 
अनुवाद - अश्विनी मराठे  

 

 विंग कमांडर प्रताप रामचंद्र मराठे यांना १९५८ च्या डिसेंबर महिन्यात भारतीय वायुदलात फायटर पायलट म्हणून कमिशन मिळाले. 

अगदी सुरुवातीला व्हॅम्पायर, हंटर, मिस्टीअर या लढाऊ विमानांचे प्रशिक्षण घेतल्यानंतर काही वर्षांनी सन १९६२ मध्ये त्यांनी हेलिकॉप्टर उडवण्याचे प्रशिक्षण घेतले आणि सलामीलाच त्यांना चीनविरुद्धच्या युध्दात कामगिरीवर पाठवण्यात आले. ईशान्य भागातील सीमावर्ती प्रदेशात त्यांनी जखमी सैनिकांना युध्दभूमीतून परत घेऊन येणे, रसद पुरवठा करणे अशा मोहिमा पार पाडल्या.
सन १९७१ मध्ये एआरसी (Aviation Research Centre) मध्ये पोस्टिंगवर असताना, त्या वेळी तिशीत असणारे मराठे तेव्हाच्या पूर्व पाकिस्तानच्या सीमेवर तैनात होते. ए आर सी (Aviation Research Centre) ही R&AW म्हणजेच ‘रिसर्च अँड अनॅलिसिस विंग’ची हवाई शाखा आहे आणि सन १९७१ च्या युद्धातील ह्या संस्थेच्या भूमिकेची तपशीलवार नोंद अनेक कारणांनी झालेली नाही.


मराठे यांच्या Mi-4 हेलिकॉप्टरच्या साथीने त्यांनी चितगाव हिल्समध्ये पाकिस्तानी सैन्याच्या पलीकडे आपले स्पेशल फ्रॉन्टियर फोर्सचे (SFF) कमांडो पोचवले आणि त्यानंतर त्या कमांडोंना युद्ध सामग्री आणि रसद पुरवठा करणे आणि जखमींना परत आणणे या मोहिमांचे नेतृत्व केले.


बांगलादेशचा जन्म ज्यातून झाला त्या सन १९७१ च्या मोहिमेच्या काळातील विंग कमांडर मराठे यांच्या कामगिरीबद्दल त्यांना ‘Mention in Dispatches’ हा बहुमान प्राप्त झाला. 


पुढे १९७९ मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि त्यानंतर १९८८ ते १९९४ ही सहा वर्षे पुनश्च एकवार वायुदलात सेवा दिली. 


त्या विंग कमांडर मराठे यांची ही विलक्षण कहाणी.

फोटो - विंग कमांडर प्रताप मराठे त्यांच्या हेलिकॉप्टरसोबत.

 ‘ये पाकिस्तानी आप को इतना तंग कर रहे हैं… क्या आप इन से नहीं लड़ोगे? ‘ आगरताळ्याला  सीमेवर तैनात असलेल्या भारतीय बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (BSF) च्या अधिकाऱ्याने सीमेपलीकडून येणाऱ्या निर्वासितांपैकी एकाला विचारले. तो बंगालीत उत्तरला, ‘पंजाबी तो बिराट मानुष. आमी तो ओल्पो (अल्प). ओल्पो की जुद्धो कोरे?’ (पंजाबी लोक किती हट्टेकट्टे असतात! आम्ही छोटे आहोत. छोटे लोक काय युद्ध करणार?’


“बांगला निर्वासितांच्या रांगाच्या रांगा सीमा पार करून भारतात येत होत्या, आणि आकाशातून आम्हाला दिसत होती त्या बाजूला मैलोनमैल पसरलेली जळती खेडी आणि प्रचंड जनसमुदाय!” गप्पांच्या सुरुवातीलाच मराठे म्हणाले. आता ते वयपरत्वे अंथरुणाला खिळलेले असले, तरी त्यांच्यात एक प्रकारचे सैनिकी चैतन्य अजूनही जिवंत होते. त्यांच्या चेहऱ्याला अर्धाअधिक झाकून टाकणाऱ्या हँडलबार मिशांच्या मागून त्यांचे डोळे मिश्किलपणे लुकलुकत होते. त्यांची पूर्वपरवानगी घेऊन मी त्यांच्याशी गप्पा मारण्यासाठी त्यांच्या घरी गेलो होतो. 


त्यांच्या खोलीत शिरताच मी त्यांना माझी ओळख करून दिली. “सर, निवृत्तीपूर्वी तुमचं जेव्हा पुण्याला पोस्टिंग होतं तेव्हा तुमच्याबरोबर फ्लाइंग करण्याची संधी मला मिळाली होती!” मी म्हणालो. प्रसन्न हसून त्यांनी मला खुणेने आत बोलावलं. ‘ऑफ कोर्स, माझ्या लक्षात आहे! त्याकाळी पुण्यात डेस्क जॉब करत असताना मला तो फ्लाइंगचा सराव मिळणं ही खूप चांगली गोष्ट होती!’ त्यांच्या तल्लख स्मरणशक्तीचे मला फार कौतुक वाटले. 


सेवानिवृत दीर्घानुभवी वैमानिक विंग कमांडर प्रताप रामचंद्र मराठे यांनी  सन १९७१ च्या युद्धात कळीची भूमिका बजावली होती. आता त्यांच्या राष्ट्रसेवेबद्दल बोलणे सुरू झाल्यावर त्यांचे डोळे एका वेगळ्याच ऊर्जेने चमकू लागले.


 सन १९७१ चा मे महिना. स्क्वॉड्रन लीडर मराठेंची नेमणूक कटक (ओदिशा) जवळच्या चारबटिया तळावर झाली होती. इथेच एव्हिएशन रिसर्च सेंटर’ ही संघटना रॉ म्हणजेच ‘रिसर्च ॲन्ड ॲनॅलिसिस विंग’ ह्या छुप्या गुप्त संस्थेच्या खाली कार्यरत होती. सुप्रसिद्ध श्री. आर एन काओ तिचे प्रमुख होते. पाकिस्तानी सैन्याला कमकुवत करण्यासाठी आणि जेव्हा युद्ध सुरू होईल तेव्हा त्यांची माघार थोपवण्यासाठी स्पेशल फ्राँटियर फोर्सच्या तिबेटी जवानांना काओ यांच्या नेतृत्वाखाली चितगांवच्या डोंगराळ प्रदेशात खास गुरिला वॉरफेअरच्या कामगिऱ्यांवर पाठवता येईल का ह्याचा अभ्यास करण्याची कामगिरी पंतप्रधान इंदिरा गांधींनी श्री काओ यांच्यावर सोपवली.   
 
त्यापूर्वी सन १९६२ च्या चीन विरुद्धच्या युद्धापूर्वी ‘युनिट 22’ उर्फ ‘टू टूज’ ची स्थापना झाली होती .  ह्या युनिटचे इन्सपेक्टर जनरल होते ब्रिगेडियर (पुढे मेजर जनरल) सुजनसिंग उबान. चिनी आक्रमणाविरुद्ध लढणाऱ्या तिबेटी सैनिकांच्या मदतीने तिबेट मुक्त करण्याची विशिष्ट कामगिरी ह्या युनिटवर होती आणि त्यासाठी त्यांना प्रशिक्षण दिले गेले होते. सन १९७१ पर्यंत ह्या युनिट मधील जवानांची संख्या वाढत जाऊन ५००० च्या आसपास झाली होती पण आता त्या युनिटला काही कामगिरी दिली जात नव्हती.

 युनिट 22 मधील सैनिक युनिटच्या प्रमुख (व एकमेव) कामगिरीसाठी म्हणजेच चीनच्या ताब्यातून तिबेटला मुक्त करण्यासाठीच वापरले जावेत असे युनिटमधील तिबेटी ऑफिसर्सचे मत होते आणि भारता’साठी’ युद्धात पडण्याची त्यांची इच्छा नव्हती. परंतु धरमशालाहून दलाई लामा यांचा स्पष्ट आदेश आल्याने ह्या सैनिकांना मुक्तिबाहिनीच्या बरोबरीने प्रशिक्षण दिले गेले आणि त्यांना १९७१ सालच्या सुरुवातीला बांगलादेशात पाठवण्यात आले.
यापैकी तीन कंपनीज ( ४०० ते ५०० सैनिक) शत्रूच्या हद्दीत दोन Mi-4 हेलिकॉप्टर्समधून एअरड्रॉप केल्या गेल्या. ह्या हेलिकॉप्टर्सचे वैमानिक होते स्क्वॉड्रन लीडर मराठे आणि फ्लाइट लेफ्टनंट परवेझ रुस्तम जामसजी. दोघांचेही ह्या हेलिकॉप्टरवर नैपुण्य होते आणि मराठेंनी तर ईशान्य भागात चीनविरुद्धच्या युद्धातही फ्लाइंग केलेले होते.


ब्रिगेडियर उबान हे थेट पंतप्रधान कार्यालयाच्या आदेशानुसार स्वतंत्रपणे कार्यरत होते. ते त्यांच्या युनि ला (युनिट २२) ‘फिफ्थ आर्मी’ असे संबोधत असत. जनरल सॅम माणेकशॉ यांच्या नेतृत्वाखालील भारतीय सैन्याला त्यांनी सहकार्य देऊ केले. ह्या त्यांच्या कृतीमुळे काहीसे  नाराजीचे वातावरण निर्माण झाले आणि ते  सैन्यात खालपर्यंत झिरपले.

सन १९७१ च्या मे महिन्यात मराठे आणि त्याचे Mi-4 यांना आगरताळा येथे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स मुख्यालयात पाठवले गेले. ब्रिगेडियर बी सी पांडे हे त्या वेळी तिथले प्रमुख होते. सीमावर्ती भागात हवाई पाहणी (reconaissance) करण्यासाठी ह्या हेलिकॉप्टरचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला.


“आगरताळ्याला मी असताना पाकिस्तानी 14 स्क्वॉड्रनचे काही फाइटर पायलट मला भेटले. हे बंगाली भाषिक  पायलट (तेव्हाचा पूर्व पाकिस्तान) आपल्याला येऊन मिळालेले  होते. माझ्या माहितीप्रमाणे, पुढे ह्या पायलट्स् ना आपण चेतक हे हेलिकॉप्टर आणि कॅरिबू हे ट्रान्स्पोर्ट विमान उडवण्याचे प्रशिक्षण दिले.”

“नोव्हेंबरच्या शेवटाकडे मला मिझो पर्वतराजीमधील लुंगलेई हवाई तळावर पाठवण्यात आलं. हा तळ चितगाव पर्वतरांगांच्या आमनेसामने होता. फ्लाइट लेफ्टनंट जमासजी तिथे आधीपासून होता, आणि स्पेशल फ्रॉन्टियर फोर्स च्या जवानांना शत्रूच्या सीमावर्ती सैन्याच्या मागील बाजूला ड्रॉप करण्यासाठी मला त्याच्याबरोबर काम करायचं होतं.”

जिथे हे ड्रॉप्स करायचे, तो भाग (ड्रॉप झोन) पूर्व पाकिस्तानच्या सीमेच्या पलीकडे पन्नासएक किलोमीटर अंतरावर असलेल्या कापटाई धरणाजवळ होता. ह्या धरणाच्या आजूबाजूला असलेल्या पाकिस्तानी ३३ एस एस जी कमांडो बटालीयनचा बीमोड करून टाकण्याची कामगिरी ड्रॉप केलेल्या कमांडोजवर सोपवलेली होती.

पहिल्या दिवशी दोन्ही हेलिकॉप्टरच्या पाच खेपा ठरल्या होत्या. सुमारे ऐंशी सैनिक आणि त्यांचे युध्द साहित्य पलीकडे ड्रॉप करायचे होते. 

“आम्ही पहिला ड्रॉप केला आणि दुसऱ्या ड्रॉप सॉर्टी दरम्यान ड्रॉप झोन मधल्या एस एफ एफ जवनांकडून संदेश आला की पाकिस्तानी लष्कर त्यांच्यावर दारुगोळ्याचा वर्षाव करत आहे, त्यामुळे पुढचा ड्रॉप करण्यापूर्वी आम्ही परिस्थिति सुधारण्याची वाट पहावी.”

मराठेंनी हेलिकॉप्टर परत फिरवले. ड्रॉप करत असताना जामसजीवर मात्र जबरदस्त हल्ला झाला. हेलिकॉप्टरच्या रडर पेडल्स मधून आत घुसलेली एक गोळी जामसजीच्या पोटरीला चाटून गेली. रक्तबंबाळ झालेल्या जामसजीने गोळ्या घुसलेले त्याचे हेलिकॉप्टर लुंगलेई तळावर परत आणले. त्याच्या जखमेवर प्रथमोपचार करण्यात आले. 

सुदैवाने हेलिकॉप्टरचे फार नुकसान झाले नव्हते आणि थोड्या दुरुस्तीनंतर ते ठीकठाक झाले. जखमी झाला म्हणून हार मानणाऱ्यातला जामसजी नव्हता. पुढच्या मोहिमेसाठी हेलिकॉप्टर तयार होताक्षणी तोही कॉकपिटमध्ये हजर झाला. 

जामसजीने दाखवलेले शौर्य आणि कर्तव्यदक्षता याबद्दल राष्ट्रपति पुरस्कारासाठी मी त्याच्या नावाची शिफारस केली. तिकडे ‘एस एफ एफ’नेही त्याचसाठी त्याची शिफारस केली होती!” फ्लाइट लेफ्टनंट जामसजीला पुढील वर्षी प्रजासत्ताक दिनी वीर चक्राने सन्मानित करण्यात आले.
ह्या युध्दात एसएफएफला दारूगोळा आणि रसद पुरवणे आणि चितगाव हिल्स मधील युद्धात जखमी झालेल्या सैनिकांना परत घेऊन येणे ह्या जबाबदाऱ्या आमच्यावर होत्या.”ह्या दोन्ही Mi-4 हेलिकॉप्टर्सनी संपूर्ण युध्दकाळात भरपूर  फ्लाइंग केले. चितगाव पडल्यानंतर भारतीय सैन्य आणि मुक्तिबाहिनी यांनी चितगाव विमानतळाचा ताबा घेतला. तेव्हा ह्या दोघा ऑफिसर्सना तिथे पाठवण्यात आले. १६ डिसेंबर १९७१ च्या पाकिस्तानच्या शरणागतीनंतर ते दोघे परत आले.

युद्ध संपल्यावर अनेक दिवस चितगावमधील जळत्या इंधनाच्या साठयांच्या ज्वाळा अनेक मैलांवरून सुद्धा दिसत असत. चितगाव शहरातून मी हिंडत असताना एक दिवस तिथे मला अचानक माझा दूरचा मावसभाऊ कमांडर उत्फुल डबीर हा भेटला! तो भारतीय नौदलाच्या एका  जहाजाचा कॅप्टन होता आणि चितगाव बंदराच्या नाकेबंदीच्या कामगिरीवर तिथे होता. युद्धातल्या त्याच्या कामगिरीबद्दल त्याला पुढे नौसेना पदकाने सन्मानित केले गेले. आम्ही दोघांनी आमच्या कुटुंबियांसाठी बरोबर नेण्यासाठी थोडी खरेदी केली. तिथे छानसे जूटचे गालिचे आणि काही इंपोर्टेड वस्तू आम्हाला खूप स्वस्तात मिळाल्या. विलायतेतून आलेले दूध पावडरचे डबे खरेदी केल्याचंही आठवतं.”

“Mi-4 हे हेलिकॉप्टर अगदी साधं पण अत्यंत भरवशाचं असं हेलिकॉप्टर होतं. नॅविगेशन साठी त्यात फक्त एक रेडियो कंपास होता. ज्या रेडियो फ्रिक्वेन्सीला आपण रेडियो ट्यून करू त्या ट्रान्समिटरची दिशा रेडियो कंपासची सुई दर्शवत असे. हवामान वाईट असेल तर हा रेडियो कंपास आमच्या फार उपयोगी पडे. अनेकदा आम्ही त्यावर ऑल इंडिया रेडियो ट्यून करून त्या आधारे आपल्या हद्दीत सुखरूप परतलो आहोत. ड्रॉप झोन्स मध्ये सैनिक आणि सामग्री कमीत कमी वेळात ड्रॉप करता यावी म्हणून आम्ही हेलिकॉप्टरचे मागील दोन्ही दरवाजे काढून टाकत असू. मात्र त्यामुळे फ्लाइंग करताना आवाजाची पातळी फार मोठी असे. आम्हाला कोणत्याही क्षणी फ्लाइंग साठी हेलिकॉप्टर उपलब्ध व्हावे अश्या रीतीने त्यांची दुरुस्ती आणि देखभाल करण्यात आमचा (वायुदलातून निवृत्त सैनिकांचा) ग्राउंड क्रू निष्णात होता.”

युद्धक्षेत्रात माझं पोस्टिंग असताना अनेक प्रसिद्ध व्यक्तींना भेटण्याची संधि मला मिळाली - जनरल जे एफ आर जेकब, जनरल सगत सिंह, श्री के एन राव… ही सगळी प्रभावी व्यक्तिमत्त्वे होती आणि त्यांची भेट आम्हाला स्फूर्तिदायक ठरत असे.
युद्ध संपले आणि शरणागतीचा करार झाला त्यानंतरची काही वर्षे आमचे एक हेलिकॉप्टर कायमस्वरूपी ढाक्का इथे ठेवलं होतं. बांगलादेश सेनेच्या बराक्स मध्ये आम्ही राहत असू आणि जिथे जाऊ तिथे आमचे अत्यंत आदराने आणि उत्साहाने स्वागत होत असे. सन १९७५ मध्ये, शेख मुजीब यांची हत्या झाल्यानंतर भारताने बांगलादेशातून आपले सैन्य मागे घेतले.”

बांगलादेशचे पहिले राष्ट्राध्यक्ष शेख मुजीबुर्रहमान पाकिस्तानी कैदेतून सुटून  सन १९७२ मध्ये बांगलादेशात परतले आणि त्यानंतर लौकरच त्यांनी त्यांच्या गावाला भेट दिली. बांग्लादेशातील गोपालगंज जिल्ह्यातल्या तुंगीपारा ह्या त्यांच्या गावी त्यांना आम्ही हेलिकॉप्टर मधून नेले होते. त्या वेळी त्यांच्या पत्नी बेगम फजेलातुन्नेसा यांचीही भेट झाली. त्यांच्या घरी आम्हाला मिळालेली राजेशाही वागणूक आणि त्यांनी आम्हाला दिलेली अत्यंत स्वादिष्ट चिकनची मेजवानी अजून स्मरणात  आहे.”

आमच्या गप्पा चांगल्या तासभर रंगल्या होत्या. आता मात्र मराठे थकलेले दिसत होते. मी आटोपते घेण्याचे ठरवले.

आणखी एकच प्रश्न, सर! चारबटियाला घरी असलेल्या कुटुंबियांबद्दल सांगा ना!”

आमचा बेस बरोबर संपर्क होई त्या त्या वेळी मी त्यांच्यामार्फत एक ‘ऑल वेल’ चा निरोप घरी पाठवत असे. घरच्यांनी फार काळजी करू नये हा हेतू. पण थांबा, तुम्ही ह्याबद्दल माझ्या पत्नीलाच विचारा ना!” असे म्हणून हसत हसत त्यांनी आपल्या पत्नीला हाक मारली. प्रसन्न मुद्रेने सौ सुहासिनी मराठे यांनी खोलीत प्रवेश केला आणि पतीकडे निरतिशय प्रेमाने पाहून त्या म्हणाल्या, ”हे कुठे जात आणि काय कामगिरीवर असत त्याबद्दल मला कधीच सांगत नसत आणि मीही कधी त्यांना त्याबद्दल विचारत नसे. ते कुठल्या तरी महत्त्वाच्या कामगिरीवर असणार हे मला ठाऊक होतं. अश्या कामगिरीसाठीच तर त्यांना एनडीए (राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, खडकवासला) पासूनच ट्रेनिंग मिळालेलं होतं. मला त्यांचा अत्यंत अभिमान वाटत असे, आणि अजूनही वाटतो!”

विमाने आणि वैमानिक युध्दावर गेले की आम्ही बायका एकत्र जमून त्यांच्यासाठी फराळ बनवत असू. त्यांचे मनोधैर्य कायम राहावे म्हणून आमचा आपला एक छोटासा प्रयत्न! सन १९७१ च्या ३१ डिसेंबरला जेव्हा हे चारबटियाला परतले तेव्हा नववर्षाच्या स्वागतासाठी फॅन्सी ड्रेस पार्टी सुरू होती. ते वेळेत पोहोचतील का नाही, काहीच माहीत नव्हते. सुदैवाने, हे वेळेत पोहोचले. आले ते फॅन्सी ड्रेस करूनच!

प्रताप ह्या पार्टीसाठी मुक्तिबाहिनी सैनिकाच्या वेशात आले होते. वाढलेली दाढी, अंगात फाटका कुडता आणि नेसूला मळकट लुंगी. कमरेभोवती काडतुसांचा चामड्याचा पट्टा. अगदी मूर्तिमंत बांगलादेशी योद्धा! मग पार्टीत नृत्य करत असताना अचानक ‘ह्यां’नी सगळ्या बायकांसमक्ष आपली लुंगी सोडून टाकली हो! सगळ्या बायका धसक्याने किंचाळायला लागल्या! अर्थात ह्यांनी लुंगीखाली पॅन्ट घातलेलीच होती म्हणा!” सुहासिनीबाई हसत हसत सांगत होत्या.

आम्ही सगळेच खळखळून हसत होतो, तितक्यात विंग कमांडर मराठ्यांना आणखी एक किस्सा आठवला. मध्यंतरी त्यांचा थकवा नाहीसा झालेला दिसत होता.

शरणागतीच्या एखादा दिवस आधीची गोष्ट. आम्ही चितगाव हवाई तळावर  निवांत बसलो होतो. पाकिस्तानात काय चालू आहे ह्याची माहिती मिळत राहावी म्हणून आम्ही आमचा रेडियो पाकिस्तानी फ्रिक्वेन्सीला लावून ठेवला होता. डिसेंबरच्या उबदार उन्हात चितगावमध्ये बसून आम्ही मजेत चहा बिस्किटांचा आस्वाद घेत असताना रेडियोवर पाकिस्तानी राष्ट्राध्यक्ष जनरल याह्या खान यांचे त्यांच्या सैनिकांना उद्देशून भाषण चालू होते. बुलंद आवाजात त्यांनी वल्गना केली - “चितगाव में घमासान लडाई हो रही है; और हम हिंदुस्तानियोंको कुचल रहे हैं!”

आता काय म्हणणार!”

विंग कमांडर मराठे यांच्या निष्ठेची, शौर्याची आणि विनोदबुद्धीची ही कहाणी म्हणजे भारतीय वायुसेनेच्या गाभ्याचे जणू लखलखते उदहरणच! नोंद नसलेल्या पराक्रमांची आणि अनाम वीरांनी केलेल्या त्यागाची आठवण अशा कहाण्या आपल्याला करून देतात.

केवळ इतिहासाच्या पानांतच नाही तर त्यांच्या सहकाऱ्यांच्या स्मृतींतही विंग कमांडर मराठे यांचा वारसा कायम राहील.

 

फोटो- विंग कमांडर मराठे पत्नी सुहासिनी यांच्यासह

 

 

 


Monday, September 15, 2025

WhatsApp हॅक झाले: साध्या सहा अंकी कोड मुळे अनेकांची फसवणूक

 




श्रीमती एम. यांच्यासाठी तो एक अगदी नेहमीचा दिवस होता. अचानक त्यांच्या फोनवर WhatsApp चा व्हेरिफिकेशन कोड — सहा अंकी क्रमांक आला. त्यांनी तो मागवलेलाच नव्हता. लगेचच WhatsApp वर त्यांच्या एका विश्वासू कॉन्टॅक्ट कडून संदेश आला:

मी चुकून तुम्हाला एक सहा अंकी कोड पाठवला आहे. कृपया तो मला परत पाठवाल का?”

त्या क्षणी त्या दुसऱ्या एका महत्त्वाच्या कॉलवर व्यस्त होत्या. फार विचार न करता घाईघाईने त्यांनी तो कोड कॉपी करून पाठवला. काही सेकंदांतच त्यांचा WhatsApp बंद पडला. त्या लॉग आऊट झाल्या होत्या. आणि त्या परत लॉगिन करण्याआधीच हॅकरने त्यांचा अकाऊंट ताब्यात घेतला.

पुढे जे घडले ते आणखीच भयानक होते — हॅकरने त्यांच्या संपर्कातील लोकांना आपण अडचणीत असल्याचे सांगून त्यांच्याकडून पैसे मागायला सुरुवात केली. हा संदेश थेट श्रीमती एम. यांच्या नंबरवरून आल्याने लोक घाबरले आणि काळजीत पडले. काहींनी पैसे पाठवण्याचाही विचार केला.


लगेच झालेले नुकसान

श्रीमती एम. यांना आपले WhatsApp चालत नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी फोन करून मला हे सांगितले. मी लगेच आमच्या ग्रुप्समध्ये पोस्ट करून टाकले की त्यांचा WhatsApp हॅक झाला आहे आणि त्यांच्या नंबरवरून आलेल्या पैशांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करावे, आणि कोड ची मागणी आली तरी कोड देऊ नये.

दुर्दैवाने, हॅकर (त्याला आपण श्री. एच. म्हणूया) फारच वेगाने काम करत होता. त्याने माझे अलर्ट डिलीट केले आणि मला काही गटांतून बाहेरही काढले.

खरे तर माझी जरा चूकच झाली. ज्या गटांमध्ये मी अ‍ॅडमिन होतो तिथून श्रीमती एम. यांचा नंबर मी सर्वात आधी काढायला हवा होता आणि मगच ग्रुपवर इशारा द्यायला हवा होता. म्हणजे हॅकरला पुढे ग्रुपचा ताबा मिळाला नसता.


तुमच्या कॉन्टॅक्ट्स पैकी कुणाचे WhatsApp हॅक झाल्यास काय करावे

  • ज्या गटांमध्ये तुम्ही अ‍ॅडमिन आहात, तिथून हॅक झालेला तो नंबर काढून टाका.

  • जर "हा अ‍ॅडमिन असल्याने त्याला काढता येत नाही" अशी अडचण आली, तर इतर अ‍ॅडमिनना सांगून काढून टाकायला सांगा.

  • ग्रुप सदस्यांना आणि इतर कॉन्टॅक्ट्सना वैयक्तिकरीत्या कळवा: “या नंबरवरून आलेल्या पैशांच्या मागण्या स्वीकारू नका. WhatsApp हॅक झाले आहे.” (श्रीमती एम. यांचा नंबर).

  • हॅक झालेला नंबर ब्लॉक आणि रिपोर्ट करा.

  • गटाच्या चॅट मध्ये महत्वाची माहिती असेल, तर Group Settings > Export Chat करून ईमेलवर सेव्ह करून ठेवा.

  • अ‍ॅडमिनने संवेदनशील माहिती असलेले मेसेज डिलीट करणे आवश्यक आहे.

श्रीमती एम. यांच्या बाबतीत धोका मोठा होता. त्या दृष्टीबाधित विद्यार्थ्यांना शैक्षणिक ऑडिओ पुस्तके पुरवणाऱ्या स्वयंसेवी गटाच्या संचालक होत्या. सर्वांचा त्यांच्यावर गाढ विश्वास होता. दुर्दैवाने, ह्या विश्वासामुळे काही जणांनी हॅकरला पैसेही ट्रान्सफर केले. काहींनी थेट फोन करून खात्री करून घेतली आणि त्यामुळे त्यांचे पैसे वाचले.

श्रीमती एम. अनेक गटांमध्ये सक्रिय असल्यामुळे हॅकरला एका फार मोठ्या नेटवर्कमध्ये प्रवेश मिळाला. त्याने OTP आणि पैसे मागणारे शेकडो मेसेज सर्वत्र पाठवले.


व्हॉट्सअॅप्  हॅकिंग कसे होते?

व्हेरिफिकेशन कोडचा सापळा

    हा कोड कुणालाही देऊ नये!
  • प्रत्येक WhatsApp खाते एका फोन नंबरशी जोडलेले असते.

  • नवीन डिव्हाइसवर WhatsApp लॉगिन करताना, एक सहा अंकी कोड WhatsAppवर येतो

  • हा कोड कधीही कोणाला देऊ नका.

  • हॅकर हा कोड देण्यासाठी आपल्याला जाळ्यात ओढतो. आणि मग खात्यावर पूर्ण ताबा घेतो.

विश्वासू संपर्काची फसवणूक

  • हॅकर बहुधा आधीच हॅक झालेल्या एखाद्या कॉन्टॅक्टच्या नंबरवरून मेसेज पाठवतो.

  • पाठवणाऱ्याचे नाव ओळखीचे दिसल्याने लोक सहज फसतात.

आर्थिक फसवणूक

  • खाते हॅक झाल्यावर, हॅकर त्या व्यक्तीच्या ओळखीच्या लोकांना पैसे मागतो.

  • बहुधा "अडचणीत असल्याची परिस्थिती" सांगितली जाते.

  • पैसे मनी म्युलकडे जातात (हॅकरच्या वतीने पैशाचे व्यवहार करणारे इसम) आणि त्यांचा माग काढणे अवघड असते.


फसवणूक टाळण्यासाठी काय करावे

तुमचा व्हेरिफिकेशन कोड कधीही शेअर करू नका

  • WhatsApp चा सहा अंकी कोड हा तुमच्या ATM पिनइतकाच गोपनीय आहे.

  • WhatsApp कधीही तुमच्याकडे हा कोड मागणार नाही. त्यामुळे हा कोड कुणीही मागितला तरी देऊ नका.

दोन-स्तरीय सुरक्षा सक्षम करा (two step verification)

  • WhatsApp मध्ये जास्तीची सुरक्षा करण्याची सोय आहे: सहा अंकी पिन + ईमेल पत्ता.

  • हे करण्यासाठी:

    • Settings > Account > Two-step verification > Enable

    •  पिन घाला आणि नीट लक्षात ठेवा किंवा लिहून ठेवा. तो फक्त तुम्हालाच माहिती असू द्या.

    • Email address देऊन authenticate / verify करा


       

       

       

       

       

       

       

       

        

अडचणीचा बहाणा करून केलेल्या पैशांच्या मागण्यांबाबत सावध रहा

  • एखाद्या मित्राने व्हॅट्सॅप्प वर पैसे मागितले तर त्याला फोन करून खात्री करून घ्या.

  • WhatsApp कॉल न लागल्यास मोबाईल नंबरवर कॉल करा.

  • कधीही फोनवर कोणालाही, कुठलाही कोड देऊ नका.

खाते हॅक झाल्यास त्वरित पुढील कृती करा-

  • WhatsApp पुन्हा इन्स्टॉल करून तुमच्या नंबरवरून लॉगिन करा.

  • support@whatsapp.com वर रिपोर्ट करा.

  • स्थानिक सायबर क्राईम सेलला कळवा

  • कॉन्टॅक्ट्सना थेट फोन करून माहिती द्या.

  • तुमचा नंबर सर्वांनी ब्लॉक व रिपोर्ट करावा असे सांगा.

  • Report करताना “Hacked for Money Fraud” असा स्पष्ट उल्लेख करा.


थोडक्यात...

डिजिटल जगात सहजासहजी विश्वास ठेवणे किती धोक्याचे आहे श्रीमती एमयांच्या अनुभवाने दाखवून दिले. केवळ एक कोड शेअर केल्याने हॅकरला संपूर्ण WhatsApp ताब्यात घेता आले आणि त्याने अत्यंत थंड डोक्याने अनेकांचे नुकसान केले.

त्याहून वाईट म्हणजे ही फसवणूक अनेक गटांमध्ये पसरली आणि ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थी यांच्यापर्यंत पोहोचली.

ह्यातले तात्पर्य स्पष्ट आहे:

  • व्हेरिफिकेशन कोड शेअर करू नका.

  • दोन-स्तरीय सुरक्षा सुरू करा.

  • हॅक झाल्यास त्वरित कृती करा.

आजच्या वेगवान डिजिटल जगात सावधगिरी हीच खरी सुरक्षा आहे.


तुमचे मत किंवा माहिती असल्यास ती कृपया कमेंटमध्ये सांगा. साइन-अपची गरज नाही, आणि तुमची वैयक्तिक माहिती इथे सेव्ह केली जाणार नाही.





WhatsApp Hacked: How a Simple 6-Digit Code Compromise Led to Fraud

 


It was just another ordinary day for Mrs. M when her phone buzzed with a WhatsApp verification code — a six-digit number she hadn’t requested. Almost immediately, she received a message from a trusted contact on WhatsApp:

“I accidentally sent you a six-digit code. Could you please share it with me?”

Without thinking twice, and because she was preoccupied on another call, Mrs. M copied the code and sent it across. Within seconds, her WhatsApp account went silent. She was logged out, and before she could regain control, the hacker had taken over her account.

What happened next was worse — the hacker began messaging her contacts, asking for money under the pretense of an emergency. Friends and family members, seeing the message come from Mrs. M’s number, were alarmed and some even considered sending funds.


The Immediate Fallout

When Mrs. M realized she couldn’t connect to WhatsApp, she reached out by phone. I immediately alerted our groups, warning everyone that her WhatsApp had been hacked and advising them not to accept any money requests from her number. Unfortunately, the hacker impersonating as Mrs M — let’s call him Mr. H — acted fast. He deleted my warnings from the groups and even removed me from those groups.

In hindsight, that was a mistake on my part. The first thing I should have done was go into the groups where I was an Admin and remove Mrs. M’s number before posting any alerts. That would have limited the hacker’s access and ability to spread the scam further.

What to Do if Your Contact’s WhatsApp Has Been Hacked

  • Remove the hacked number from any groups where you are an Admin.

  • If you get an error saying you cannot remove that Admin, ask other Admins to attempt the removal.

  • Send direct messages to as many contacts as possible: “Do not accept money requests from this number because the WhatsApp is hacked.” (Mrs M’s number)

  • Block and report the compromised number.

  • If important information is stored in a group, go to Group Settings > Export Chat and email the conversation for safekeeping.

  • Admins must also delete any messages with sensitive information.

In Mrs. M’s case, the stakes were higher. She was a source of a lot of support for the visually impaired, and managed a group assisting visually impaired students with educational material. She was both trusted and loved by everyone. Sadly, some of her contacts believing the requests were genuine, transferred small sums. A few cautious members tried calling her directly - WhatsApp calls were declined by Mr. H, but regular phone calls went through to Mrs M, and those payments were thankfully avoided.

Because Mrs. M was active in multiple groups, the hacker gained access to a wide network of contacts. Using this, he propagated the fraud across various circles — sending more OTP requests and urgent money appeals.


How the Hack Works

  1. The Verification Code Trap

    Every WhatsApp account is tied to a phone number.

    When someone tries to register WhatsApp on a new device, the app sends a 6-digit verification code via WhatsApp to the owner’s number.

    Hackers trick the victim into handing over this code, which allows them to take full control of the WhatsApp account.

    The image below is what the request looks like 

    NEVER give this or any other code 
     

  2. The Trusted Contact Deception

    Hackers often send the request from an already-compromised contact’s account.

    Because the message comes from a familiar name, victims feel safe responding, almost compelled, really.

  3. Monetary Fraud

    Once inside, hackers impersonate the victim and message contacts asking for urgent financial help.

    The help asked for involves transferring money to a third person, with a promise to return it in a day or two. Alternate reasons could be given like, Gpay is blocked etc. The money goes to a money mule, and can rarely be traced.

    This exploits trust within social circles and spreads the scam further.


How to Avoid Falling Victim

  1. Never Share Your Verification Code

    The 6-digit WhatsApp verification code is as private as your ATM PIN.

    WhatsApp itself will never ask you to share it with anyone.

  2. Enable Two-Step Verification

    WhatsApp offers an extra layer of security: a 6-digit PIN that is required in addition to the verification code. Add an email address also.

    To activate:

    Go to Settings > Account > Two-step verification > Enable.

    Choose a PIN only you know.

    Go to Settings > Account > Email address.

    Add your email address and verify it from via email received from WhatsApp. 

      • The two settings to secure your account

  1. Be Wary of Urgent Requests

    If a friend messages asking for money or a code, verify by calling them directly. DO NOT transfer money unless you speak to your contact. Never give ANY code to anyone over the phone as a watertight rule.

    Hackers rely on urgency to bypass your critical thinking.

  2. Act Quickly if Compromised

    If you lose access to your WhatsApp, reinstall it and try to log in immediately using your own phone number.

    Report the issue to WhatsApp via support@whatsapp.com.

    Report the issue to the local cybercrime helpdesk.

    Inform your contacts on phone that your account was hacked so they don’t fall prey to scams. Ask your family and friends to pass on this message on all the groups.

    Ask your contacts to block your compromised number. 

    Give the reason “Other” and type “Hacked for Money Fraud”. Select “Report to WhatsApp” and block. Multiple block requests with this message will help WhatsApp deactivate that account.

 

 

 

 

 

 

 

 

Key Takeaway

Mrs. M’s experience is a reminder of how easily trust can be exploited in the digital world. A moment of absentmindedness — sharing what seemed like an innocent code — gave a hacker complete control of her WhatsApp account.

Worse, the fraud spread quickly across groups and even targeted vulnerable students she supported. The lesson is clear: prevention and quick action matter.

Protect yourself by keeping your verification codes private, enabling two-step verification, and acting swiftly if a contact is hacked. In the age of instant communication, vigilance is your best defense.


Do you have any more information that will help others? Please put them in the comments below, a sign up is not required and none of your data is saved.




Saturday, September 13, 2025

WILL Essentials 05 - Information about Living Will or Advance Medical Directives for the Terminally ill - Post 5 of 5

 

Beyond Property: Living Wills, Advance Directives, and Succession Laws

In the previous blogs, we explored the importance of making a Will, drafting it clearly, and the painful consequences of dying without one. But there’s another equally important aspect of planning for the future—your medical choices.

Alongside that, it’s vital to understand the legal framework that governs inheritance in India when no Will is made.

This page is the last page of a 5 part blog, the previous page is titled "Without a Will- Burdens on your loved ones after you pass"


What Is a Living Will (Advance Medical Directive)?

A Living Will, also called an Advance Medical Directive, is a legal document that specifies the kind of medical care you want—or don’t want—if you become unable to communicate your wishes.

This could include decisions about:

  • Use of ventilators or feeding tubes in terminal illness.
  • Whether you want life-prolonging treatment when recovery chances are negligible.
  • Whether doctors should perform resuscitation (CPR) in critical cases.

The key idea is simple: your family shouldn’t have to make these painful choices for you without guidance on what your wishes were.


Why It Matters

Modern medicine can sometimes prolong life at the cost of comfort and dignity. A Living Will ensures your preferences are respected and relieves your loved ones of guilt or conflict when making medical decisions.

For example, I recently signed a Do Not Resuscitate (DNR) form during hospital admission, clearly stating that I didn’t want aggressive life-extending treatment in certain situations. This made my family’s role much easier—they simply had to follow my wishes.


Legal Recognition in India

  •         In 2018, India's Supreme Court allowed people to draw up living wills and thereby choose passive euthanasia, where medical treatment can be withdrawn under strict guidelines to hasten a person's death. Active euthanasia - any act that intentionally helps a person kill themselves - is illegal in the country. Here is a link to a blog about the SC Judgement from 2018 about a Living Will. Dr Nikhil Datar, a Malad-based gynaecologist had filed this case. He also fought for and won many rights for pregnant women. 
  •          BBC brought out an article on the importance of a Living Will, the link is here.
  • A hospital in Mumbai has started a clinic to help prepare a living Will - here is the link.

The Hindu Succession Act: What Happens Without a Will

If you don’t leave behind a Will, the Hindu Succession Act decides how your assets are divided. Here’s a simplified view:

  • For Male Hindus
    • Assets are divided equally among all Class I heirs (wife, children, and mother).
    • If there are no Class I heirs, property goes to Class II heirs (father, siblings, grandchildren, etc.).
  • For Female Hindus
    • Assets pass first to sons, daughters, and husband.
    • If none, then to the husband’s heirs.
    • Next to her parents.
    • Finally, to the heirs of her father and mother.
  • Agnates and Cognates
    • If there are no Class I or Class II heirs, property may pass to distant relatives connected through male (agnates) or mixed (cognates) lineage.

The takeaway? Without a Will, your spouse does not automatically inherit everything. Assets can be split among multiple heirs, creating legal and emotional complications.


A Final Call to Action

Throughout this series, we’ve looked at:

  1. Why everyone needs a Will.
  2. The difference between nominees and beneficiaries.
  3. How to draft a Will with clarity.
  4. The painful consequences of dying intestate.
  5. Living Wills and succession laws.

The message is clear: don’t delay. Creating a Will—or revising an existing one—takes only a little effort but saves your loved ones years of struggle.

Take a deep breath, step out of your comfort zone, and do it today. Your family will thank you tomorrow.

To make it simple, here is a template for making a Will. It is formatted for Legal sized paper, with a header (leaving extra space for the Registrar’s stamp) and footer for your Identity document details.

 

This page is part of a 5 part series of posts. The complete indexed list of links is below.

Make your Will now – Part 1 of 5 

Key terms in Making a Will- Nominations Beneficiaries Part 2of 5

Drafting a Will - Guidelines and tips Part 3 of 5

Without a Will - Burdens on your loved ones after you pass -Part 4 of 5

Living Will or Advanced Medical Directives - Post 5 of 5

Document File for Will Template Click here for a link to the Will Template 

 


सन १९७१ च्या युद्धवीराची अनंतात भरारी

भारतीय वायुदलाच्या गाभ्याशी असलेल्या कर्तव्यदक्षता, शौर्य आणि तल्लख विनोदबुद्धी या गुणांचे एक उत्तम उदाहरण म्हणजे विंग कमांडर प्रताप मराठे. ...